Ayurved · Health

उपवासाचा उद्देश साध्य करा.

उपवासाचा उद्देश साध्य करा.
दिव्याची अमावस्या झाली की श्रावण महिना चालू होतो..मग कुणी पुर्ण श्रावण महिनाच उपवास करतो तर कुणी फक्त सोमवार-शनीवार अशे एक – दोन दिवस या महिन्यात उपवास करतो. तर कुणी पुर्ण चार्तुमासच उपवास धरतो. आपआपल्या शरीराच्या कुवतीप्रमाणे हे उपवाससत्र सुरू होते…उपवासाची परंपरा सगळया धर्मामध्ये आणि सस्कृंतीमध्ये अगदी पूर्वापार चालत आली आहे. ठराविक कालावधीसाठी अगदी अल्पसा आहार घेणं किंवा जड पदार्थ दूर ठेवून पोटाला विश्रांती देणं हा उपवासामागचा उद्देश ! आयुर्वेददृष्टीने याचा विचार केला तर पावसाळयात आपला अग्नि ऋतूप्रभावामुळे मंद असतो त्याकरिता पचायला हलके आहार घ्यावे किंवा भूक नसल्यास खावू नये किंवा कमी खावे –असा आरोग्यदायी विचार! मग हा विचार प्रत्यक्षात अमलांत यावा म्हणून आपल्या पुर्वजंानी त्यास धार्मिक किनार जोडली..श्रावण मासात उपवास श्रेष्ठ ही सकंल्पना रूजल्या गेली…थोडं निरिक्षण करून बघा हिंदु धर्मीयंाचा श्रावण म्हणून उपवास, तर मुस्लिम लोकंाचा रमजान म्हणून रोजा, ज्यू लोक योम कुप्पूरसाठी उपास तर जैन समाजात पर्युषण पर्व म्हणून उपवास सागिंतल्या गेले आहेत..परंतु आपण सर्वांनी मिळून अगदी एकजुटीने उपवास मागील उध्दीष्ट पार मोडून टाकले. उपवास म्हणून आपण चवीने साबुदाणा, बटाटा, रताळे, चिप्स्, शेंगदाणे, असा पचायला गरिष्ट आहार अगदी चवीने घेतो. संध्याकाळचा रोजा खोलण्यासाठी सर्वात आधी पेंडखजूर तोंडात टाकल्या जाते, यासाठी की पेंडखजूरात प्रचुर शक्ती आहे, लोह तत्व भरपूर आहे, सात्वीक पदार्थात त्याचा समावेश होतो…पेंडखजूर अधिक खावे हा पण उद्देश आहे…परंतु ही मंडळी सुध्दा दिवसभर रिकाम्या पोटी रहायचे आहे हया हेतूने संध्याकाळी तळीव, भजे, पापडया, मासांहार अधिक प्रमाणात घेतात. तसे आहाराच्या बाबतीत जैन धर्मीय बांधवाचीं प्रशंसाच करायला हवी…ही मंडळी सध्यंाकाळी सुर्यास्तापुर्वीच आहार घेतात तसेच कंद, मुळे, कांदा असा तामसी आहार वज्र्य करतात. खरं तर उपवास हे धर्मशास्त्रात एक प्रकारचं व्रत मानलं गेलयं, आत्मशुध्दीचं व्रत. उप अधिक वास अशी उपवास शब्दाची फोड –त्यात उप म्हणजे जवळ व वास म्हणजे राहणे अर्थात उपवास म्हणजे इश्वराच्या जवळ राहणे या दिवशी सात्वीक आहार घ्यावा, अल्प प्रमाणात आहार घ्यावा, तसेच दिवसभर इ·ाराचे नामस्मरण करावे..काम, क्रोधादि षड्रिपूपासून दुर राहण्याचा यत्न करावा ! परंतु आपण सर्व गोष्टी मोडीत काढण्यात पटाईतच आहोत !
उपवासामुळे शरीराच्या काही क्रियांना विश्रांती मिळते, पचनक्रिया सुधारते. शरीरशुध्दी साठी उपवास उपयोगी पडते, पण तो योग्य रितीने केलेला हवा. तरच आपल्या शरीरातील आम म्हणजे विषद्रव्याचे ज्वलन होते / बाहेर निघते. हेच आम पुढे अनेक विध रोगास कारणीभूत ठरते. चार्तुमासांच औचित्य साधून अनेकजण वजन घटविण्यासाठी उपवास करतात, उपवासामुळे वजन घटतं खरं, पण असं घटलेलं वजन त्याच वेगाने पुन्हा वाढू शकतं, म्हणून वजन स्थायीरूपाने आटोक्यात राहण्यासाठी उपवासाच्या काळातसुध्दा भरपूर व्यायाम आणि खाण्यासाठी लो कॅलरी फुङ…उपवासाचे सुध्दा असे अनेक पदार्थ आहेत. उपवास आहे म्हणून एकदाच भरपेट न खाता 4-5 वेळा आपण खायला हवं. उपवासाच्या काळात सुध्दा आपली जेवणाची वेळ ही नियमित असावी…
रोज 1 ग्लास दुध घ्यावे, पण बिना साखरेचे, साय काढलेले, पण त्यात अद्रक भरपूर टाकावी. तसेच दुपारी जेवणानतंर एखाद्या तासाने ताजं ताक घ्यावं. त्यात सुध्दा पुदीना, जिरे, मि­याची पुड, आलं खिसून टाकावं, चवसुध्दा झक्कास येते. नतंर तीन -चार वाजता फळं खावी किंवा कधी कधी फळंाचा रस घ्यावा, कधी नारळाचं पाणी, लिंबू पाणी प्यावं. फळात केळी, चिक्कू शक्यतोवर टाळावी. आणि फळांच्या रसात साखर घेणं टाळावं. संध्याकाळच्या फराळात भगर, शेगंदाणा, साबुदाणा पेक्षा राजगि­याच्या पदार्थांचां वापर अधिक करावा. राजगि­याच्या घरी फोडलेल्या लाहया सर्वोत्तम पर्याय, कधी कधी राजगि­याची पोळी किंवा दोन लाडू देखील चालतील. अधून मधून अजींर , पेंडखजूर, किशमिश देखील चालतील. सलादमध्ये काकडी, दुधीभोपळा, गाजर, हे उपवासाचे उत्तम पदार्थ! उपवासाच्या काळात पाणी मात्र भरपूर प्यायला हवे. असा उपवास केला तर वजनही उत्तमरित्या / स्थायी प्रकारे कमी होईल तोही कुठलाही अशक्तपणा न येता आणि ख­या अर्थाने उपवास होईल.
द्वारा :-
डॉ. सौ. कविता पवन लड्डा
आयुर्वेदाचार्य
लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय
लड्डा स्किन अॅण्ड हेल्थ केअर सेटंर
गर्भसंस्कार केंद्र,
पदमा नगर, बार्शी रोड लातूर.
दुरध्वनी(02382) 221364

मोबाईल09326511681

Leave a comment